औरंगाबाद: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यशासनाने क्युरेटीव पिटीशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळकाढूपणा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून छ. संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजाला मिळालेलेे SEBC आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२० मध्ये रद्द केले होते यासंदर्भात दाखल पुनर्विचार याचिकाही दोन दिवसापूर्वी फेटाळली. यापार्श्वभूमीवर छ. संभाजीनगर शहरातील सकल मराठा समाजाची शनिवारी सायंकाळी जिजामाता कन्या विद्यालयात बैठक झाली.
या बैठकीत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी राज्यशासनाविरोधात १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणीही राज्यसरकाशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला येथे येण्यास भाग पाडावे, असे यावेळी ठरले.
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…