महाराष्ट्र

जमिनीची खरेदी-विक्री करताना ‘या’ 5 गोष्टी जरूर जाणून घ्या, अन्यथा…

औरंगाबाद: जमिनीची खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम. मात्र ज्यांना ही गोष्ट सवयीची असते त्यांच्यासाठी ते सहज सोपं असतं. अशात जमिनी संबंधित 5 गोष्टी प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे. या 5 गोष्टी जर जमिनी खरेदी विक्री करताना तपासल्या नाही, तर भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

जमिनीची चतुर्सिमा

जमिनीची चतुर सीमा म्हणजे हद्द आहे. शेजाऱ्याने बांध करण्याचे आणि बांध सरकवण्याचे प्रकार आपण ऐकले असतील. जमिनीची हद्द सारखं क्षेत्र पूर्ण भरते की नाही याच्या बाबतीमध्ये तुम्ही माहिती घेतली पाहिजे आणि त्याची माहिती घेणे काहीही चुकीचं नाही, यासाठी तुम्ही जमीन व्यवस्थित मोजून चतुर सीमा प्रमाण आहे की नाही, ते तपासणे आवश्यक आहे.

जमिनीवरील बोजा व न्यायप्रविष्ठ खटला

जमिनीवर कुठल्या बँकेचे कर्ज आहे की नाही, हे तपासमे फार महत्त्वाचे आहे. कारण जमीन कुठे गहाण वगैरे ठेवून जर त्यावर पैसा वगैरे उचललेला असेल आणि तुम्हाला डुब्लिकेट सातबारा दाखवून जमिनीची खरेदी विक्री होत असेल, तर फसवणूक होऊ शकते. यासाठी डिजिटल सातबारा काढून क्रॉस चेक करता येऊ शकते.

सातबारावर असणारी नावे

सातबारा वर असणारी व्यक्तींची एकूण नावे तपासणे देखील आवश्यक आहे. जो व्यक्ती जमीन विकत आहे त्याच्याच नावावर सातबारा आहे का किंवा इतर काही वारसदार त्याला लावले आहेत का? तसेच काही कुळ त्यावर लावलेले आहे का, ती व्यक्ती हयात आहेत का आणि हयात असताना त्यांच्यासाठी काही हरकत तर नाही ना, यासंदर्भातील गोष्टींचा विचार तुम्ही करणे आवश्यक आहे.

जमीन आरक्षित तर नाही ना?

काही जमिनींना हिरवा पट्टा किंवा पिवळा पट्टा इत्यादी गोष्टी आरक्षित करते. जर जमीन या आरक्षित प्रकारातील आहे. तर याची चौकशी करणे फार गरजेचे आहे. कारण की ही जमीन गव्हर्मेंट च्या ताब्यातही असू शकते म्हणजेच शासन काही जमिनींना हिवाळा पट्टा किंवा पिवळा पट्टा लावलेला असतो.

जमिनीत येण्या-जाण्यासाठी रस्ता

ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. याबाबच नेहमीच वाद होतात. त्यामुळे प्लॉट किंवा जमीन खरेदी करताना त्यामध्ये किती फुटाचा रस्ता आहे, शासन नियमानुसार त्याचा नकाशा बघून तो रस्ता दाखवलेला असताना तो रस्ता योग्य प्रमाणे आहे का? शेतीमध्ये बैलगाडी जाते का, रस्ता पुढे भविष्यात बंद होईल की नाही या संदर्भातील सर्व माहिती घेणे गरजेचे असते

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

10 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago