महाराष्ट्र

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट…

तुमची मुलं बोगस शाळेत तर शिकत नाही ना..?

औरंगाबाद: अनाधिकृत शाळांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. शिक्षण विभागाची परवानगी न घेता शाळा सुरू करणे, नियम आणि अटींची पूर्तता न करताच एडमिशन करणे, दुसऱ्या शाळांच्या यूआयडी क्रमांकावर विद्यार्थ्यांची एडमिशन असेल, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम भासवून केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवणे. असे अनेक प्रकार सर्रासपणे अनेक शहरात सुरू असल्याने यात विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक तर होतेच आहे, शिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतही खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.

राज्यात तब्बल ६९० अनधिकृत शाळा आढळल्या असून यापैकी २०० शाळा शासनाने बंद केल्या असून तुमची मुलं अनधिकृत शाळेत तर शिकत नाहीये ना, हे तपासून पाहण्याची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याची ओरड सातत्यानं होतेय. शाळांची मनमानी, फी वाढ याची अनेक उदाहरणे समोर आलीयत. मात्र आता चक्क अनेक शाळाचं अनाधिकृत आणि बोगस असल्याचं आढळून आल्याने ज्ञान दानाचं काम करणाऱ्या शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसलाय.

अनधिकृत शाळा आणि बंद केलेल्या शाळांची आकडेवारी पुढीलप्रमाणे

छत्रपती संभाजीनगर:- अनधिकृत शाळा – ०६, बंद केलेल्या शाळा – ०६

मुंबई:- अनधिकृत शाळा – ५१७, बंद केलेल्या शाळा – ८८

पुणे:- अनधिकृत शाळा -६९, बंद केलेल्या शाळा – ३२

लातूर:- अनधिकृत शाळा – ०१, बंद केलेल्या शाळा – ००

कोल्हापूर:- अनधिकृत शाळा – २८, बंद केलेल्या शाळा – २७

नागपूर:- अनधिकृत शाळा – ४०, बंद केलेल्या शाळा – ३५

अमरावती:- अनधिकृत शाळा – ०२ , बंद केलेल्या शाळा -०२

नाशिक:-  अनधिकृत शाळा – २७, बंद केलेल्या शाळा -१०

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

13 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago