मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला.
बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ते म्हणाले, “अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची केवळ एक नव्हे, तर दोन वेळा स्पष्ट संधी होती. त्या दोन्ही वेळांचा साक्षीदार मी स्वतः आहे.”
पहिल्या संधीबाबत बोलताना पाचपुते म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाच्या 62 आमदारांपैकी 57 आमदारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करावे, अशी लेखी समर्थनपत्रे दिली होती. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे ही संधी हुकली.”
दुसऱ्या वेळेस विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 72, तर काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या वेळीही पक्षातील अंतर्गत विरोधामुळे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, असा दावा पाचपुते यांनी केला.
“अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पक्षात ठाम भूमिका घेतली. त्याची किंमत मला पक्षातून बाहेर पडून मोजावी लागली,” असेही पाचपुते म्हणाले.अजित पवार यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना पाचपुते म्हणाले, “अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे अपूरणीय नुकसान झाले आहे. जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले गेलेले, पण प्रत्यक्षात न होऊ शकलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख कायम राहील.”
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…