महाराष्ट्र

अजित पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली! अंतर्गत राजकारण कारणीभूत;  बबनराव पाचपुते यांचा दावा

मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला.

बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ते म्हणाले, “अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची केवळ एक नव्हे, तर दोन वेळा स्पष्ट संधी होती. त्या दोन्ही वेळांचा साक्षीदार मी स्वतः आहे.”

पहिल्या संधीबाबत बोलताना पाचपुते म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाच्या 62 आमदारांपैकी 57 आमदारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करावे, अशी लेखी समर्थनपत्रे दिली होती. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे ही संधी हुकली.”

दुसऱ्या वेळेस विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 72, तर काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या वेळीही पक्षातील अंतर्गत विरोधामुळे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, असा दावा पाचपुते यांनी केला.

“अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पक्षात ठाम भूमिका घेतली. त्याची किंमत मला पक्षातून बाहेर पडून मोजावी लागली,” असेही पाचपुते म्हणाले.अजित पवार यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना पाचपुते म्हणाले, “अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे अपूरणीय नुकसान झाले आहे. जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले गेलेले, पण प्रत्यक्षात न होऊ शकलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख कायम राहील.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

2 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

3 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

3 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

3 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

3 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

3 तास ago