मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड झाली असावी, तसेच इंधनात घातपात करून इंजिन बंद पाडले गेले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली.
मिटकरी यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत अपघातातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याची माहिती मिळत असल्याचे सांगितले. तो सध्या कॅलिफोर्नियात असल्याचा दावा त्यांनी केला. सुरुवातीला Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी विमानात सहा जण असल्याचे सांगितले होते; मात्र नंतर पाच मृतदेह सापडल्याने विसंगती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टी आणि हँगर परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचेही मिटकरी यांनी सांगितले.
सध्या या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीमार्फत सुरू आहे. ब्लॅक बॉक्सबाबत सुरुवातीला तो जळालेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. तरीही अपघाताची खरी कारणे आणि प्रवाशांबाबतची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, या अपघातामागे घातपात होता की ही दुर्दैवी दुर्घटना होती, याबाबत सत्य समोर येण्यासाठी पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची गरज असल्याची मागणी वाढत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष आता तपासाच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…
पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…
1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…
केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…
डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची…