महाराष्ट्र

अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड झाली असावी, तसेच इंधनात घातपात करून इंजिन बंद पाडले गेले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली.

मिटकरी यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत अपघातातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याची माहिती मिळत असल्याचे सांगितले. तो सध्या कॅलिफोर्नियात असल्याचा दावा त्यांनी केला. सुरुवातीला Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी विमानात सहा जण असल्याचे सांगितले होते; मात्र नंतर पाच मृतदेह सापडल्याने विसंगती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टी आणि हँगर परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचेही मिटकरी यांनी सांगितले.

सध्या या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीमार्फत सुरू आहे. ब्लॅक बॉक्सबाबत सुरुवातीला तो जळालेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. तरीही अपघाताची खरी कारणे आणि प्रवाशांबाबतची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, या अपघातामागे घातपात होता की ही दुर्दैवी दुर्घटना होती, याबाबत सत्य समोर येण्यासाठी पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची गरज असल्याची मागणी वाढत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष आता तपासाच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

3 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

3 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

3 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

11 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

11 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

12 तास ago