महाराष्ट्र

ठाण्यातून राष्ट्रवादीचा पलटवार! रोहित पवारांचे राजकारण ‘घृणास्पद’; आनंद परांजपे

ठाणे: अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनावरून आमदार रोहित पवार राजकारण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवारांचे वर्तन “अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद” असल्याचे म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन सीबीआयमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली होती.

परांजपे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आवश्यक ती कारवाई व गुन्हा नोंदवण्याबाबत आश्वासन दिले असतानाही रोहित पवार यांनी पुन्हा राजकीय हालचाली सुरू ठेवल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतल्याचा उल्लेख करत, “मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्यानंतरही गुन्हा दाखल करण्याचे राजकारण थांबवावे,” असे आवाहन केले.

२ जुलै २०२३ रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अजितदादा पवार यांना कुटुंबाने एकटे पाडल्याचा आरोप करत परांजपे यांनी लोकसभा निवडणुकीतील वक्तव्यांची आठवण करून दिली. “विधानसभा निवडणुकीत ‘मला कुटुंबाने एकटे पाडले, पण बारामतीची जनता मला एकटे पाडणार नाही’ अशी भावना दादांनी व्यक्त केली होती. तो व्हिडिओ आजही सर्वांकडे उपलब्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय अधिवेशनातील जय पवार यांना मागील रांगेत बसविल्याचा आरोपही परांजपे यांनी फेटाळला. अधिवेशनाचे फेसबुक लाईव्ह सुरू असताना सूत्रसंचालकांनी जय पवार यांना पुढे बसण्याचे आवाहन केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

“अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकारण करणे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. महाराष्ट्रासमोर सत्य यावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे,” असे परांजपे यांनी शेवटी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

1 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

16 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

21 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

21 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

21 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

21 तास ago