पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये बोलताना अजित पवार वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजित पवार यांनी तर ‘कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो’, असे वैतागून बोलून धन्यवाद मानले.
पिंपरी शहरातील वृक्ष तोडी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासावर भर देत जोरदार भाषण केले. पण भाषण जसं संपत आलं, तसं सभागृहामधून एक व्यक्ती उभी राहिली आणि शहरात कशा प्रकारे वृक्षतोड सुरू आहे, अशी माहिती दिली आणि पालकमंत्री म्हणून तुम्ही हे बंद करावे, अशी विनंती केली.
सामाजिक कार्यकर्त्याचं सगळू ऐकून घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले की, कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो. कुणीही उठते आणि मला उपदेश करायला लागतं. सगळा मक्ता मीच घेतला. उपदेश करायचे, ठीक आहे, धन्यवाद’ असे म्हणून हात जोडून भाषण आटोपतं घेतले. अजितदादांच्या याा वक्तव्यामुळे सभागृहात मात्र एकच हश्शा पिकला.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…