पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये बोलताना अजित पवार वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजित पवार यांनी तर ‘कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो’, असे वैतागून बोलून धन्यवाद मानले.
पिंपरी शहरातील वृक्ष तोडी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासावर भर देत जोरदार भाषण केले. पण भाषण जसं संपत आलं, तसं सभागृहामधून एक व्यक्ती उभी राहिली आणि शहरात कशा प्रकारे वृक्षतोड सुरू आहे, अशी माहिती दिली आणि पालकमंत्री म्हणून तुम्ही हे बंद करावे, अशी विनंती केली.
सामाजिक कार्यकर्त्याचं सगळू ऐकून घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले की, कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो. कुणीही उठते आणि मला उपदेश करायला लागतं. सगळा मक्ता मीच घेतला. उपदेश करायचे, ठीक आहे, धन्यवाद’ असे म्हणून हात जोडून भाषण आटोपतं घेतले. अजितदादांच्या याा वक्तव्यामुळे सभागृहात मात्र एकच हश्शा पिकला.
शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…
२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…
1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…