महाराष्ट्र

मनसेच्या राड्याचा सुरक्षारक्षकांना फटका; पाच जणांची बदली

पुणे: महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्‍यांनी केलेल्या राड्याचे पडसाद सुरक्षारक्षकांवर उमटले आहेत. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा ठपका ठेवत महापालिकेच्या दोन कायमस्वरूपी आणि तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी जारी केले.

स्वच्छतेच्या विषयावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत असताना मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अ‍ॅड. किशोर शिंदे, संजय भोसले, तांबोळी यांच्यासह आणखी एक कार्यकर्ता थेट मीटिंग रूममध्ये घुसले.

या वेळी आयुक्त आणि मनसे पदाधिकार्‍यांमध्ये तीव्र वाद झाले. त्यानंतर आयुक्त कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले, तर मनसे व महाविकास आघाडीने देखील आंदोलन करून या घटनेचा निषेध केला.

मात्र, या प्रकरणाचा परिणाम थेट सुरक्षाव्यवस्थेवर झाला. आयुक्त कार्यालयातील बैठकीमध्ये विनापरवानगी घुसखोरी झाल्याने सुरक्षा यंत्रणेतील कसूर मानून त्या दिवशी ड्युटीवर असलेले पाच सुरक्षारक्षक, त्यात दोन महापालिकेचे कायम रक्षक आणि ‘ईगल सिक्युरिटी अँड पर्सोनलसर्व्हिसेस’ या कंत्राटी कंपनीचे तीन रक्षकाची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

8 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

15 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago