महाराष्ट्र

बार्टीतील ३ संस्थांमधील गैरव्यवहारप्रकरणी अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या ३ संस्थांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे दाखले देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणारे प्रशिक्षण सामाजिक न्याय विभागाचे पदसिद्ध अध्यक्ष व सचिव यांनी शासन निर्णय डावलून बंद केले का असा प्रश्न आज विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परिषद सभागृहात दानवे यांनी उपस्थित केला. तसेच ३ संस्थांमध्ये सारखेच प्राध्यापक प्रशिक्षक म्हणून काम करत असून विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक बदलले जात आहे. तसेच गुणांकन वाढवून दिले जात आहे.

तसेच या तिन्ही संस्थांचे कार्यालय हे मंगल कार्यालयात सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही दानवे यांनी केली. तसेच हे प्रशिक्षण बंद झाल्यामुळे ९ हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानाबाबतही दानवे यांनी सभागृहात आवाज उठवित सरकारला याबाबत उत्तर देण्यास भाग पाडले. या सर्व घटनांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाणार असल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

5 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

11 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

11 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

12 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

12 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

12 तास ago