महाराष्ट्र

बार्टीतील ३ संस्थांमधील गैरव्यवहारप्रकरणी अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या ३ संस्थांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे दाखले देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणारे प्रशिक्षण सामाजिक न्याय विभागाचे पदसिद्ध अध्यक्ष व सचिव यांनी शासन निर्णय डावलून बंद केले का असा प्रश्न आज विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परिषद सभागृहात दानवे यांनी उपस्थित केला. तसेच ३ संस्थांमध्ये सारखेच प्राध्यापक प्रशिक्षक म्हणून काम करत असून विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक बदलले जात आहे. तसेच गुणांकन वाढवून दिले जात आहे.

तसेच या तिन्ही संस्थांचे कार्यालय हे मंगल कार्यालयात सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही दानवे यांनी केली. तसेच हे प्रशिक्षण बंद झाल्यामुळे ९ हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानाबाबतही दानवे यांनी सभागृहात आवाज उठवित सरकारला याबाबत उत्तर देण्यास भाग पाडले. या सर्व घटनांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाणार असल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

6 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

9 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

9 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

10 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

10 तास ago