nitin-thorat-award
शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री. थोरात यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन), आत्मा पुणे आणि पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरधवल जगदाळे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे व प्रमुख उपस्थिती सभापती महिला व बालकल्याणच्या अंकिता पाटील त्याचबरोबर सभापती कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास अमोल नलावडे तसेच दिपाली होलावळे, विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपाली गव्हाणे तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शरदचंद्रजी पवार सभागृह, जिल्हा परिषद,पुणे येथे कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय कृषी सन्मानाने सन्मानित असलेल्या शेतकऱ्यांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला. शिरूर तालुक्यातील नितीन अर्जुन थोरात यांचाही सन्मान सभापती अमोल नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, भोर, वेल्हे, आंबेगाव, पुरंदर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शेतकरी, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेतकऱ्याच्या श्रमाचा हा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले.
नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!
आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!
नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान
शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके…
मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि…
मुंबई: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे "चोराच्या उलट्या बोंबा"…
मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम…
मुंबई: राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचा अत्यंत गंभीर मुद्दा आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार…
मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा…