nitin-thorat-award
शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री. थोरात यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन), आत्मा पुणे आणि पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरधवल जगदाळे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे व प्रमुख उपस्थिती सभापती महिला व बालकल्याणच्या अंकिता पाटील त्याचबरोबर सभापती कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास अमोल नलावडे तसेच दिपाली होलावळे, विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपाली गव्हाणे तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शरदचंद्रजी पवार सभागृह, जिल्हा परिषद,पुणे येथे कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय कृषी सन्मानाने सन्मानित असलेल्या शेतकऱ्यांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला. शिरूर तालुक्यातील नितीन अर्जुन थोरात यांचाही सन्मान सभापती अमोल नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, भोर, वेल्हे, आंबेगाव, पुरंदर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शेतकरी, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेतकऱ्याच्या श्रमाचा हा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले.
नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!
आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!
नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…
मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या…
जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर…