महाराष्ट्र

भाजप कार्यकर्त्याला आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी अंबादास दानवे आक्रमक

मुंबई: दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्याला स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने मारहाण केल्याचा मुद्दा आक्रमकपणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडून याप्रकरणी सरकारने खुलासा करावा, तसेच संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून असाच एकप्रकार दहिसर मध्ये समोर आला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यात राज्यात शिवसैनिकांना मारहाणीचे प्रकार झाले असून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले. पोलीस अशा प्रकरणांमध्ये एकांकी भूमिका घेत आहेत. दहिसर मध्ये लोकप्रतिनिधी व विधानसभेचे प्रतिनिधी यांच्या जवळपास ५० ते ५५ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. बिबीशन वारे अस त्या कार्यकर्त्यांच नाव आहे. मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी व हातात काठ्या लाट्या घेऊन हे सर्व लोकं त्या कार्यकर्त्याला मारत असल्याचे दिसत आहे. यात एका गुन्हेगाराचे नाव आशिष नायर असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. यात आमदार यांच्या मुलाच्या ड्रायव्हरचा देखील समावेश आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब लावला. तसेच पालिकेच्या रुग्णालय प्रशासनानेही त्या जखमी तरुणाला दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तरुणाला न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

9 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

9 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

9 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

10 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

11 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

11 तास ago