विचार करण्याचा प्रश्नच नाही; सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नेत्या रुपाली चाकणकर यांना जोरदार शब्दांत सुनावले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत “विचार केला जाईल” असे वक्तव्य केल्याने मिटकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “विचार करण्याचा प्रश्नच येत नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर थेट आक्षेप घेतला.
‘सुनेत्रा पवारच खऱ्या राजकीय उत्तराधिकारी’
अमोल मिटकरी म्हणाले,“सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत. त्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही त्या जागेसाठी विचार होऊ शकत नाही. आज केवळ महाराष्ट्रातच नाही, तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे हेच मत आहे. त्यामुळे ‘प्रस्ताव आला तर विचार करू’ अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनांना धक्का देणारे आहे.”
“सुनेत्रा वहिनीच राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करू. या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका घेणाऱ्यांना आमचे समर्थन नसेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अध्यक्षपदावरून चर्चा तापली
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, यावरून पक्षात चर्चा आणि मतभेद उफाळून आले आहेत.
निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
मिटकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.“आम्हीही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार आहे का? की फक्त वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार?” असा सवाल त्यांनी केला.
‘पक्षाचा खरा कणा म्हणजे कार्यकर्ता’
“पक्ष म्हणजे फक्त नेते नाहीत. अजितदादांसाठी जो कार्यकर्ता रडला, ज्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, अजितदादा गेल्यानंतर ज्याच्या घरात आजही सुतक आहे – तो कार्यकर्ता हा पक्षाचा खरा कणा आहे,” अशा भावनिक शब्दांत मिटकरींनी आपली भूमिका मांडली.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…