महाराष्ट्र

अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडेबोल; म्हणाले…

विचार करण्याचा प्रश्नच नाही; सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नेत्या रुपाली चाकणकर यांना जोरदार शब्दांत सुनावले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत “विचार केला जाईल” असे वक्तव्य केल्याने मिटकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “विचार करण्याचा प्रश्नच येत नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर थेट आक्षेप घेतला.

‘सुनेत्रा पवारच खऱ्या राजकीय उत्तराधिकारी’

अमोल मिटकरी म्हणाले,“सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत. त्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही त्या जागेसाठी विचार होऊ शकत नाही. आज केवळ महाराष्ट्रातच नाही, तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे हेच मत आहे. त्यामुळे ‘प्रस्ताव आला तर विचार करू’ अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनांना धक्का देणारे आहे.”

“सुनेत्रा वहिनीच राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करू. या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका घेणाऱ्यांना आमचे समर्थन नसेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय अध्यक्षपदावरून चर्चा तापली

२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, यावरून पक्षात चर्चा आणि मतभेद उफाळून आले आहेत.

निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मिटकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.“आम्हीही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार आहे का? की फक्त वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार?” असा सवाल त्यांनी केला.

‘पक्षाचा खरा कणा म्हणजे कार्यकर्ता’

“पक्ष म्हणजे फक्त नेते नाहीत. अजितदादांसाठी जो कार्यकर्ता रडला, ज्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, अजितदादा गेल्यानंतर ज्याच्या घरात आजही सुतक आहे – तो कार्यकर्ता हा पक्षाचा खरा कणा आहे,” अशा भावनिक शब्दांत मिटकरींनी आपली भूमिका मांडली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

18 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago