मनोरंजन

RSS च्या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी; ‘भाईजान’च्या फॅशनवर मोहन भागवतांची मिश्कील टिप्पणी

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. मात्र, बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या उपस्थितीने कार्यक्रमात विशेष उत्साह पाहायला मिळाला.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सलमान खानचे उदाहरण देत समाजात फॅशन आणि ट्रेंड कसे तयार होतात, याबाबत महत्त्वाचे निरीक्षण मांडले. विशेष म्हणजे, भागवत हे विधान करत असताना सलमान खान स्वतः समोर बसून शांतपणे त्यांचे भाषण ऐकत होता.

आपल्या भाषणात मोहन भागवत म्हणाले, “समाजात फॅशन आणि ट्रेंड हे प्रभावातून निर्माण होतात. सलमान खान काय घालतो? महाविद्यालयीन विद्यार्थी तेच परिधान करतात. तो ते का घालतोय, हे कुणालाच माहीत नसतं. पण तो घालतो म्हणून ती गोष्ट लोकप्रिय होते. ती चांगली असो किंवा वाईट, फॅशनमुळे ती समाजात पसरते.”

पुढे ते म्हणाले, “जे लोक फॅशन किंवा ट्रेंड घडवतात, त्यांना समाजात प्रभावशाली मानले जाते. अशा लोकांना आपल्या भाषेत ‘महाजन’ म्हटलं जातं. समाज ज्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यांचा आदर करतो, त्यांचे अनुकरण केले जाते.”

सलमानसह दिग्गजांची उपस्थिती या कार्यक्रमाला सलमान खानसोबतच ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई आणि प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनीही उपस्थिती लावली होती. सलमान खान कार्यक्रमस्थळी पोहोचताच त्याचा एक झलक पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, या कार्यक्रमातील सलमान खानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मोहन भागवतांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

1 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

2 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

5 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

7 तास ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

7 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

8 तास ago