मुंबई: नागपूर ग्रामीण येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेली जागा नियमबाह्य पद्धतीने विकल्याच्या गंभीर आरोपांवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणात सहकार मंत्र्यांनी सभागृहात महत्त्वाची कबुली देत सादर झालेला चौकशी अहवाल चुकीचा असल्याचे मान्य केले आणि सहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच मुख्य अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची एका महिन्यात चौकशी पूर्ण करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
काय आहे प्रकरण?
नागपूर येथील आनंद सोसायटीच्या खसरा क्रमांक १०अ आणि १० ब मधील ११ हजार १०७ चौरस फूट जागा सार्वजनिक उपक्रमासाठी (ट्रान्सफॉर्मरसाठी) आरक्षित होती. मात्र संस्थेचे सचिव कैलास चुटे यांनी कथित आर्थिक व्यवहार करून ही जागा प्लॉटधारक साळुंखे यांना बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप आहे.
वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले की, बेसा ग्रामपंचायत असताना दोन लेआऊट सार्वजनिक उपक्रमासाठी आरक्षित असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र बेसा नगरपंचायत झाल्यानंतर नकाशामध्ये बदल करून तीच जागा विकल्याचे उघड झाले. या प्रक्रियेत मुख्य अधिकारी आणि संबंधित उपनिबंधकांनी चुकीची नोंद व अहवाल दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारची भूमिका
प्रश्नोत्तर काळात उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर सहकार मंत्र्यांनी अहवालात त्रुटी असल्याचे मान्य करत तत्काळ सहाय्यक निबंधकांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सांगितले.या घोटाळ्यामुळे नागपूर ग्रामीण परिसरात मोठी चर्चा रंगली असून चौकशी अहवालानंतर आणखी कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…
eye twitching म्हणजे नेमके काय अचानक डोळा लवणे किंवा फडफडणे हे तसं खूपच सामान्य लक्षण…
मेष: रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन संधी व अधिकार मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण…
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…