महाराष्ट्र

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी! तिरंगा फडकवण्यामागील महत्त्वाचा फरक

मुंबई: स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आपल्या सर्वांच्या बालपणातील गोड आठवणींशी निगडीत आहेत. शाळा-कॉलेजमध्ये पांढरे कपडे घालून मैदानात जमून तिरंग्याला सलामी देणे, नंतर मिळणाऱ्या चॉकलेट्सची मजा हे सगळं आजही मनात ताजं राहते. मात्र, या दोन राष्ट्रीय दिवसांवर राष्ट्रध्वज फडकवण्याची पद्धत आणि त्यामागील अर्थ वेगळा असतो, जे अनेकांना माहित नसते.

ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे

15 ऑगस्ट (ध्वजारोहण): स्वातंत्र्यदिनी तिरंगा खांबाच्या खाली बांधलेला असतो. तो दोरीच्या साहाय्याने खालून वर नेऊन फडकवला जातो. हा सोहळा ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा फडकवल्याचे प्रतीक आहे, म्हणजेच स्वतंत्र राष्ट्राचा उदय.

26 जानेवारी (ध्वज फडकवणे): प्रजासत्ताक दिनी तिरंगा आधीच खांबाच्या वरच्या टोकाला बांधलेला असतो आणि फक्त दोरी ओढून फडकवला जातो. याचा अर्थ भारत आधीच स्वतंत्र असून, संविधानाच्या अंमलबजावणीने तो प्रजासत्ताक राष्ट्र बनला आहे.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतीची भूमिका

स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान ध्वजारोहण करतात. कारण 1947 मध्ये संविधान लागू नव्हते आणि राष्ट्रपती पद अस्तित्वात नव्हते.

प्रजासत्ताक दिन: राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असल्यामुळे हा सोहळा त्यांना पार पाडण्याचा अधिकार आहे.

स्थळ आणि महत्त्व

15 ऑगस्ट: लाल किल्ला, ऐतिहासिक सोहळा

26 जानेवारी: कर्तव्य पथ, भव्य लष्करी परेडसह

26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने गणराज्य बनला. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा, तर 26 जानेवारी हा संविधान व लोकशाहीच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

2 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

23 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

23 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

23 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

23 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago