आरोग्य

पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक, त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी चवीला एकदम मस्त असते. फार प्रसिद्ध आहे तसेच घरी केलेल्या साजूक तुपासोबत ही पोळी खाल्ली जाते. तसेच त्यासोबत कटाची आमटी असतेच. मात्र आणखी एक पदार्थ केला जातो. तो म्हणजे नारळाचे दूध. पुरणपोळी या नारळाच्या दुधात बुडवून खाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. हे नारळाचे दूध फक्त चवीला छान नसते तर आरोग्यासाठीही फार चांगले असते.

नारळाचे दूध पचनासाठी फार चांगले असते. या दुधात अॅण्टी बॅक्टेरियल सत्व असतात. तसेच कॅल्शिअम असते. लोह भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम असते. जीवनसत्त्व ‘सी’, ‘ई’, ‘बी’ यांचे प्रमाणही भरपूर असते. आतड्यांच्या आरोग्यासाठी हे दूध फायद्याचे ठरते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. काही जणांना गायीचे दूध पचत नाही. त्यांच्यासाठी बदामाच्या दुधाप्रमाणे हा ही एक पर्याय आहे. या दुधाचा अजिबात त्रास होणार नाही.

त्वचेसाठी नारळाचे दूध अगदी उत्तम. त्वचा मऊ-मुलायम होते. त्वचेवरील डाग तसेच पिंपल्स, मुरुम आदी कमी होण्यासाठी या दुधाचा फायदा होतो. हे दूध प्यायल्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. त्वचेला गरजेची असलेली आर्द्रता या दुधातून मिळते. केसांसाठी तर एकदम प्रभावी असा पदार्थ आहे. नारळ मुळातच केसांसाठी छान असतो. त्यामुळे नारळाचे दूध नियमित प्यायल्याने केस मऊ, मजबूत आणि दाट होतात.

नारळाच्या दुधाचा असा एक उपयोग आहे जो फार कोणाला माहिती नाही. अनेकांना पित्ताचा फार त्रास असतो. सतत उलट्या होतात, डोकं दुखतं. ज्यांना असे पित्त होते त्यांच्यासाठी नारळाचे दूध औषधी आहे. पित्ताचे प्रमाण कमी करुन पोटाला थंडावा देण्याचे काम हे दूध करते. नारळाचे दूध घ्यायचे आणि त्यात थोडा गूळ घालायचा. हे मिश्रण चवीला एकदम मस्त लागते. तसेच त्याचा आरोग्यासाठी फायदाही होतो. नारळाचे दूध चवीला छान असतेच आणि आरोग्यासाठीही फार फायद्याचे असते. त्यामुळे या पदार्थाचा आहारात नक्कीच समावेश करावा. पण अति प्रमाणात नारळाचा दूध पिऊ नका. त्याचा उलटा परिणाम होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कोंडीने उद्योगांना स्थलांतराची भीती; मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोरेगाव भीमा : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव…

27 मिनिटे ago

स्मरणशक्ती वाढवणारे बेस्ट ५ फूड्स, सोबतच आणखी सुधारेल मेंदुचं काम

शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक…

56 मिनिटे ago

थकवा त्या मागची कारणे व उपाय

थकवा हा शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा असू शकतो. जर सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे…

1 तास ago

MMRDA भरती परीक्षेच्या निकालावर काँग्रेसचा आक्षेप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही.…

1 तास ago

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी : मदत कौतुकास्पद, पण निकषांचा पुनर्विचार गरजेचा

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच…

1 तास ago

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाची आमदार साजीद खान पठाण यांच्यावर जबाबदारी; १९ ऑगस्टला पदग्रहण

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे आमदार साजीद खान पठाण १९ ऑगस्ट…

1 तास ago