महाराष्ट्र

‘शिका, संघटित व्हा’ हा बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

मुंबई:“शिका, संघटित व्हा” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली असून, या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने सुचारूपणे चालतो, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’ लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात स्थानिक जनप्रतिनिधी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “बाबासाहेबांनी जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून भारताचे संविधान तयार केले. हे संविधान जगातील सर्वोत्तम घटनांपैकी एक आहे. याच संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. सामान्य माणूसही बाबासाहेबांनी दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे आणि संविधानिक हक्कांमुळे उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो.”

त्यांनी पुढे सांगितले की, देशातील दलित, शोषित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता.

चेंबूरमध्ये उभारण्यात आलेली ‘भीम ज्योत’ ही केवळ स्मारक ज्योत नसून, बाबासाहेबांच्या विचारांची अखंड प्रेरणा देणारी प्रतीकात्मक ज्योत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. “ही ज्योत बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण सतत करून देत राहील. बाबासाहेबांना मनःपूर्वक अभिवादन करतो,” असे ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

13 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

20 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago