चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण
मुंबई:“शिका, संघटित व्हा” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली असून, या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने सुचारूपणे चालतो, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’ लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात स्थानिक जनप्रतिनिधी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “बाबासाहेबांनी जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून भारताचे संविधान तयार केले. हे संविधान जगातील सर्वोत्तम घटनांपैकी एक आहे. याच संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. सामान्य माणूसही बाबासाहेबांनी दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे आणि संविधानिक हक्कांमुळे उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, देशातील दलित, शोषित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता.
चेंबूरमध्ये उभारण्यात आलेली ‘भीम ज्योत’ ही केवळ स्मारक ज्योत नसून, बाबासाहेबांच्या विचारांची अखंड प्रेरणा देणारी प्रतीकात्मक ज्योत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. “ही ज्योत बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण सतत करून देत राहील. बाबासाहेबांना मनःपूर्वक अभिवादन करतो,” असे ते म्हणाले.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…