महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ने ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ ही एकात्मिक डिजिटल व्यवस्था सुरू केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सेवांसाठी एकाच व्यासपीठावर सुविधा उपलब्ध होणार असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सांगितले.

मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या परीक्षा, निकाल प्रक्रिया आणि उपकेंद्र स्थापन करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. अमित शेष यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अभियांत्रिकी आणि फार्मसी विद्याशाखांतील उन्हाळी व हिवाळी सत्रांचे सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. एका शैक्षणिक वर्षात तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल प्रसिद्ध करून विद्यापीठाने ‘शून्य निकाल प्रलंबितता’ हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट गाठले आहे.

मंत्री पाटील म्हणाले की, परीक्षा दिल्यानंतर निकालाच्या प्रतीक्षेचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी तणावपूर्ण असतो. मात्र, वेळेत निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, रोजगार आणि उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध होणार आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियोजन, ईआरपी प्रणालीतील सुधारणा आणि प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे हे यश शक्य झाले आहे. सध्या केवळ ९६२ निकाल तांत्रिक कारणांमुळे तात्पुरते प्रलंबित असून संबंधित प्रक्रिया पूर्ण होताच ते जाहीर करण्यात येणार आहेत.

अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक उत्तीर्णता नोंदविली असून सातव्या आणि आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८४ ते ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे परीक्षा अर्ज, निकाल, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, पुनर्मूल्यांकन अर्ज तसेच तक्रार निवारण यांसारख्या सर्व सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री पाटील यांनी विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवोपक्रम यांवर विशेष भर द्यावा, असे आवाहन केले. तसेच निकाल प्रक्रियेतील उल्लेखनीय यशाबद्दल प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago