महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या मातीत माजोरीगिरी खपवून घेतली जाणार नाही

मुंबई: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, इथली माती, हवा, पाणी, संस्कृती आणि भाषा मराठी आहे. या भूमीत येऊन पोट भरायचं, पाय रोवायचे, धंदा-पाणी करायचं, मोठं व्हायचं आणि वर इथल्या भाषेकडे तुच्छतेने पाहायचं? महाराष्ट्राच्या मातीवर उगवून तिच्याच संस्कृतीला हरामखोरीने झिडकारणाऱ्या प्रवृत्तीना आता ठेचल्याशिवाय राहणार नाही!राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी इशारा दिला आहे.

भैय्याजी जोशी यांनी “मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही” असं विधान करून मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या भूमीत घुसला असाल, तर इथल्या मातीत मिसळलंच पाहिजे! नाहीतर महाराष्ट्र कधी काय करेल हे सांगता येणार नाही! आमची शांतता ही आमची कमजोरी समजू नका. इतिहास गवाळांसाठी नाही, मराठ्यांनी स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांना कसा धडा शिकवला याची जिवंत साक्ष आहे!

सहिष्णुतेच्या नावाखाली मराठी माणसाला गिळायला तुम्ही शिकला असाल, पण अजून आम्ही गप्प बसलेलो नाही. महाराष्ट्र म्हणजे कुणाच्या बापाचा बंगला नाही, की कोणी उठावं आणि आपली मनमर्जी लादावी! मुंबईत आलात, इथली हवा खाल्ली, इथला पाऊस अंगावर घेतला, इथल्या जमिनीवर उभं राहिलात, तर मराठी बोलावी लागेलच! नाहीतर मग तुमची गाठ महाराष्ट्राच्या मातीशी आहे!

आम्ही कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या अंगावर आलात तर भल्याभल्यांना बडवायचं आमच्या रक्तात आहे! इतिहास डोळ्यासमोर ठेवा, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव, शिवरायांच्या महाराष्ट्रात जर कुणी मातीत राहून मातीतलीच भाषा नाकारली, तर त्याच्या मुसक्या आवळायलाही आम्ही मागे हटणार नाही.

उगीच गोडगोड बोलून फोडाफोडीचे डाव टाकू नका. महाराष्ट्रात राहायचं, कमवायचं, मोठं व्हायचं? मग मराठी शिकायचीच लागेल! नाहीतर मग महाराष्ट्रात पाय रोवणं कठीण होईल.

मुंबईत राहायचं, इथून कमवायचं, मोठं व्हायचं, पण इथल्या माणसाशी दोन शब्द मराठीत बोलायला लाज वाटते? मग लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीचा स्वभाव मऊ असला तरी वेळ आल्यावर तो दगड होतो आणि कुणाच्या डोक्यात फोडायचा, हे आम्ही ठरवतो.आसे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे.

मराठी शिकलीच पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात जगणं कठीण होईल. आम्ही कुणाच्या विरोधात नाही, पण आमच्या मुळावर उठलात, तर मातीत पुरल्याशिवाय राहणार नाही, मराठीला कमी लेखणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जाईल, हे ठाम आहे, बोललं, ते ठरलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

22 तास ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago