मध्य प्रदेश: इथेनॉल मिश्रणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन करताना त्यांनी शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर टीका केली.
रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाचे समर्थन केले. इथेनॉलच्या वापरामुळे इंधनासाठी परदेशावर असलेले अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, तसेच इथेनॉल उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला.
ब्राझीलमध्ये इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे सांगत भारतीय वाहनेही पूर्णपणे इथेनॉलवर चालण्यास सक्षम असल्याचे मिश्रा यांनी म्हटले. त्यामुळे इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, असा त्यांचा युक्तिवाद होता.
मात्र, शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर बोलताना मिश्रा यांची जीभ घसरली. “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येते का?” असे वक्तव्य त्यांनी व्यासपीठावरून केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावर आधीच मतमतांतरे व्यक्त होत असताना भाजप खासदारांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कार्यक्रमाला मध्य प्रदेशातील अनेक नेते उपस्थित होते.
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची आज…
चाकण : मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आठ…
अयोध्या : अयोध्या विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि परसवा गावचे रहिवासी विजय मिश्रा यांचा भीषण…
मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं.…