महाराष्ट्र

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला असला तरी दक्षिण भारतातील जनतेने भाजपाचा विभाजनवादी विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगाल मध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने नियम व परंपरांचे उल्लंघन केले. एनआयए, सीआरपीएफ तसेच एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात आले. तरीही भाजपाने गैरप्रकारांच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला, असा आरोप त्यांनी केला.

मात्र दक्षिण भारतात भाजपाची ही रणनीती निष्फळ ठरली. विशेषतः केरळ मध्ये काँग्रेसचा विजय हा लोकशाही व संविधानाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसचा विचार आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास दाखवला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.देशाला काँग्रेसचा विचारच तारू शकतो, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी म्हटले की, केरळमधील विजयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून हीच ऊर्जा आगामी काळात पक्षाला बळ देईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

16 मिनिटे ago

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…

1 तास ago

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

2 तास ago

‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र…

2 तास ago

खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

अपघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ठाणे : संकटाच्या…

2 तास ago

पेट्रोल-डिझेल निर्यात महागली! केंद्राचा मोठा निर्णय; ATF वरही शुल्कवाढ

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ…

3 तास ago