मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला असला तरी दक्षिण भारतातील जनतेने भाजपाचा विभाजनवादी विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगाल मध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने नियम व परंपरांचे उल्लंघन केले. एनआयए, सीआरपीएफ तसेच एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात आले. तरीही भाजपाने गैरप्रकारांच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला, असा आरोप त्यांनी केला.
मात्र दक्षिण भारतात भाजपाची ही रणनीती निष्फळ ठरली. विशेषतः केरळ मध्ये काँग्रेसचा विजय हा लोकशाही व संविधानाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसचा विचार आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास दाखवला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.देशाला काँग्रेसचा विचारच तारू शकतो, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी म्हटले की, केरळमधील विजयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून हीच ऊर्जा आगामी काळात पक्षाला बळ देईल.
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…
मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…
मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…
मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…
पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…