महाराष्ट्र

पुनर्विकास प्रकल्पांमध्ये दिरंगाई करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाका…

अस्लम शेख यांची सूचना चांगली, सूचनेचा निश्चितपणे विचार केला जाईल: देवेंद्र फडणवीस

मुंबई: वर्षानुवर्षे पुनर्विकास प्रकल्प रखडवणाऱ्या विकासकांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेत केली. विधानसभेत तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित लक्ष वेधीवरील चर्चेत सहभागी होत आमदार अस्लम शेख यांनी विकासकांकडून होणाऱ्या दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला.

अस्लम शेख म्हणाले की, काही विकासक पुनर्विकास प्रस्ताव जमा करुन दुसऱ्या विकासकांचा शोध सुरु करतात. प्रत्यक्षात मात्र काहीच काम करीत नाही. प्रस्ताव जमा करणं आणि प्रत्यक्षात मात्र काहीच काम न करण हाच उद्योग हे विकासक वर्षानुवर्षे करीत आलेले आहेत. या विकासकांनी १०-१० वर्ष पुनर्विकासाचे प्रकल्प रखडवले आहेत. अशा विकासकांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकुन पुन्हा त्यांना कधीच पुनर्विकास प्रकल्पांसाठी पात्र न ठरवण्याची गरज आहे. तसेच कोळीवाडी व गावठणांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) प्रकल्प राबऊ नयेत असे सरकारचे धोरण आहे. मात्र कोळीवाडे व गावठणांना लागुनच असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना देखील स्थगिती देण्यात आलेली आहे. ही स्थगिती उठविणार का..? असा प्रश्नही अस्लम शेख यांनी उपस्थित केला.

अस्लम शेख यांनी केलेली सूचना निश्चितपणे चांगली आहे. या सूचनेचा विचार केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली. तसेच ३१ कोळीवाडे व गावठणांचे सीमांकन झालेले आहे. कोळीवाड्यांच्या सीमांच्या आत कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांना नव्याने मान्यता देण्यात येणार नाही. कोळीवाडे व गावठणांसाठी नवीन डिसीआर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

11 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago