महाराष्ट्र

पुनर्विकास प्रकल्पांमध्ये दिरंगाई करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाका…

अस्लम शेख यांची सूचना चांगली, सूचनेचा निश्चितपणे विचार केला जाईल: देवेंद्र फडणवीस

मुंबई: वर्षानुवर्षे पुनर्विकास प्रकल्प रखडवणाऱ्या विकासकांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेत केली. विधानसभेत तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित लक्ष वेधीवरील चर्चेत सहभागी होत आमदार अस्लम शेख यांनी विकासकांकडून होणाऱ्या दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला.

अस्लम शेख म्हणाले की, काही विकासक पुनर्विकास प्रस्ताव जमा करुन दुसऱ्या विकासकांचा शोध सुरु करतात. प्रत्यक्षात मात्र काहीच काम करीत नाही. प्रस्ताव जमा करणं आणि प्रत्यक्षात मात्र काहीच काम न करण हाच उद्योग हे विकासक वर्षानुवर्षे करीत आलेले आहेत. या विकासकांनी १०-१० वर्ष पुनर्विकासाचे प्रकल्प रखडवले आहेत. अशा विकासकांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकुन पुन्हा त्यांना कधीच पुनर्विकास प्रकल्पांसाठी पात्र न ठरवण्याची गरज आहे. तसेच कोळीवाडी व गावठणांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) प्रकल्प राबऊ नयेत असे सरकारचे धोरण आहे. मात्र कोळीवाडे व गावठणांना लागुनच असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना देखील स्थगिती देण्यात आलेली आहे. ही स्थगिती उठविणार का..? असा प्रश्नही अस्लम शेख यांनी उपस्थित केला.

अस्लम शेख यांनी केलेली सूचना निश्चितपणे चांगली आहे. या सूचनेचा विचार केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली. तसेच ३१ कोळीवाडे व गावठणांचे सीमांकन झालेले आहे. कोळीवाड्यांच्या सीमांच्या आत कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांना नव्याने मान्यता देण्यात येणार नाही. कोळीवाडे व गावठणांसाठी नवीन डिसीआर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

8 मिनिटे ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

14 मिनिटे ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

19 मिनिटे ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

25 मिनिटे ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

2 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

2 तास ago