आरोग्य

गणपतीत बिनधास्त खा उकडीचे मोदक; ‘या’ समस्यांवर आहे रामबाण उपाय

कोणताही सण आला की भारतीय घरांमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असते. त्यातही गणेशोत्सव म्हणजे बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनणाऱ्या मेजवानीवर ताव मारण्याची चांगली संधी असते. उकडीचे मोदक, वालाचे बिरडे, पातोळ्या अशा पदार्थांची गणेशोत्सवात रेलचेल असते. आता हे इतकं सगळं खायचं म्हणजे पुन्हा वजन वाढणार, रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असेल तर पुन्हा डोक्याला ताप. या सगळ्या विचारांनी आपण जर मन मारून राहत असाल तर आजच्या या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्की आनंद होणार आहे. तुम्ही अगदी डाएटवर असाल तरी बिनधास्त उकडीचे मोदक खाऊ शकता कारण उकडीच्या मोदकातील सामग्री ही तुमच्या अनेक समस्यांवर उपाय सिद्ध होऊ शकते.

बद्धकोष्ठवर उपाय: उकडीच्या मोदकाचे सारण हे तुपात बनवले जाते व तूप हे बद्धकोष्ठवर रामबाण उपाय आहे. तसेच सारणातील नारळामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया जलद होते. मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी उकडीच्या मोदकांचा फायदा होता.

त्वचेसाठी परिणामकारी: तुपामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. व्हिटॅमिन ए, ओमेगा ३ फॅटी ऍसिड यामुळे चेहऱ्यावर तजेला येतो. तुम्हाला सतत पिंपलचा त्रास असेल तर उकडीचे मोदक खाणे नक्कीच परिणामकारी सिद्ध होते.

रक्तदाबावर नियंत्रण: उकडीच्या मोदकातील पोषक तत्त्वांमुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. यामुळे हृदयाच्या नसांवरील तणाव कमी होऊन रक्तदाब सुरळीत होण्यात मदत होते.

ग्ल्यायस्मिक इंडेक्स कमी: मोदक हा तांदूळ, खोबरं, गूळ यांच्या मिश्रणाने बनवलेला असतो. मोदकाचा ग्ल्यास्मिक इंडेक्स कमी असतो. उकडीच्या मोदकाचे प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये झटकन चढ- उतार होण्याचा धोका टळतो.

पोटातील जळजळीवर आराम: तांदळाच्या पिठात व्हिटॅमिन बी 1 आणि साखर असते ज्यामुळे तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा कमी होते. कार्बोहायड्रेट आणि फायबरमुळे जर तुम्हाला अपचन, पोटात जळजळ असे त्रास असतील तर त्यावर आराम मिळतो.

हाडांची मजबुती: मोदकाच्या सारणात वापरले जाणारे खोबरे व सुका मेवा यात मॅंगनीजचे प्रमाणही जास्त असते जे निरोगी हाडांसाठी आवश्यक असते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

11 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

11 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

11 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

11 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

11 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

11 तास ago