मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, हा ई-मेल कोणी पाठवला आणि त्यामागे कोणती शक्ती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात खलिस्तानी संघटनेचा हात असल्याची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.जर अशा महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याच्या धमक्या येत असतील, तर हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तसेच सध्या अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा या धमकीशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर ताणले गेलेल्या संबंधांमुळे भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असेही ते म्हणाले.या संपूर्ण प्रकरणाचा गृहविभागाने सखोल तपास करून संबंधित ई-मेलचा उगम शोधून काढावा आणि याबाबत सभागृहात तातडीने निवेदन करावे, अशी आग्रही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…