महाराष्ट्र

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. त्यामुळे गॅस तुटवड्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. १९३० साली इंग्रजांनी मीठावर कर लादल्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवले होते. त्याच प्रेरणेने आज जनतेने आंदोलन करून सरकारला जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही देशाला अनेक जागतिक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस सरकारने सर्व घटकांशी संवाद साधत योग्य नियोजन केले आणि इंधन किंवा गॅस तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. आजच्या सरकारकडे मात्र संवाद आणि नियोजनाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले की, माझ्यावर व काँग्रेसवर भाजपाच्या नेत्यांकडून खालच्या पातळीवर टीका केली जाते. हा विचार बहुजनांचे हक्क नाकारणारा असून हजारो वर्षांचा संघर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशाच विचारांचा सामना करावा लागला होता. त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून फडणवीस यांना सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना करतो, असे सांगत त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या “छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता, टूटे दिल से कोई खड़ा नहीं होता” या ओळी उद्धृत केल्या.

दरम्यान, विधानभवनात बॉम्ब असल्याचा ई-मेल आल्याच्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या घटनेतून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचे दिसून येते. विधानभवनच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यभर काँग्रेसचे आंदोलन

गॅसच्या किमतीत वाढ आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावेत आणि गॅस सिलेंडर सुरळीत उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केल्याची माहितीही सपकाळ यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावावर शोककळा; 11 के व्ही विद्युत तारेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या…

4 तास ago

शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी

पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…

12 तास ago

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

1 दिवस ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

1 दिवस ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

1 दिवस ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

1 दिवस ago