महाराष्ट्र

उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेचं सावट; शिक्षकांना सुट्टीऐवजी सरकारी कामाची जबाबदारी

मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असून, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी जनगणनेचे काम अनिवार्य करण्यात आले आहे. सुट्ट्यांच्या काळात मुख्यालय सोडू नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

२०११ नंतर प्रथमच होत असलेल्या जनगणनेअंतर्गत १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची मोजणी व यादी तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्याआधी एप्रिल अखेरपासून मेच्या सुरुवातीपर्यंत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुलैमध्ये टीईटी परीक्षा होण्याची शक्यता असून, जनगणना कामामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सुट्ट्यांमध्ये जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्या कालावधीची विशेष रजा दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रावर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे मत आहे.घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याच्या अटीमुळे दिव्यांग शिक्षक संघटनांनी या कामातून सूट देण्याची मागणी केली असून, यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनेही सादर करण्यात आली आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

8 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

8 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

8 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

12 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

12 तास ago