महाराष्ट्र

उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेचं सावट; शिक्षकांना सुट्टीऐवजी सरकारी कामाची जबाबदारी

मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असून, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी जनगणनेचे काम अनिवार्य करण्यात आले आहे. सुट्ट्यांच्या काळात मुख्यालय सोडू नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

२०११ नंतर प्रथमच होत असलेल्या जनगणनेअंतर्गत १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची मोजणी व यादी तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्याआधी एप्रिल अखेरपासून मेच्या सुरुवातीपर्यंत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुलैमध्ये टीईटी परीक्षा होण्याची शक्यता असून, जनगणना कामामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सुट्ट्यांमध्ये जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्या कालावधीची विशेष रजा दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रावर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे मत आहे.घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याच्या अटीमुळे दिव्यांग शिक्षक संघटनांनी या कामातून सूट देण्याची मागणी केली असून, यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनेही सादर करण्यात आली आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत मोदी अव्वल; नव्या भारताच्या सामर्थ्याला जगाची मान्यता; एकनाथ शिंदे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामरिक क्षेत्रात प्रभावी झेप…

7 तास ago

कारेगावच्या यश इन चौकात कचऱ्याचे साम्राज्य; ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगावच्या प्रवेशद्वारासारखी ओळख असलेल्या यश इन चौकात गेल्या अनेक दिवसांपासुन कचऱ्याचा…

20 तास ago

करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला उभे असलेले महावितरणचे विजेचे खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा अधिक प्रमाणात…

20 तास ago

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…

2 दिवस ago

शिंदेंची ताकद वाढली, ठाकरेंपुढे नवे राजकीय आव्हान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…

2 दिवस ago

शिरूर! आमदाबादच्या युवकाने 27व्या वाढदिवसानिमित्त केली 27 वृक्षांची लागवड…

शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…

2 दिवस ago