महाराष्ट्र

अंशकालीन स्त्री परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ, एप्रिलपासून ६ हजार रुपये

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू होणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

गाव पातळीवर, विशेषतः आदिवासी, दुर्गम व डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात अंशकालीन स्त्री परिचरांची भूमिका महत्त्वाची आहे. विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे कामही त्या प्रभावीपणे पार पाडतात.

२०१९ च्या शासन निर्णयानुसार या परिचरांना दरमहा ३ हजार रुपये मानधन दिले जात होते. मात्र, कामाचे वाढते स्वरूप, आरोग्य सेवेत वाढलेली जबाबदारी आणि महागाईचा विचार करता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेत त्यांच्या मानधनात ३ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांना एकूण ६ हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करताना सर्व जिल्हा परिषदांनी प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मानधन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक महिन्याच्या दहाव्या तारखेपर्यंत मानधन अदा करण्याचेही आदेश आहेत.या निर्णयामुळे राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

5 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

10 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

10 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

10 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

10 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

12 तास ago