महाराष्ट्र

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवत फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून शुक्ला यांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिला यांची ओळख विक्रोळीतील बिल्डिंग प्रपोजल विभागात काम करत असताना झाली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख पुढे वैयक्तिक जवळिकीमध्ये बदलली.

दरम्यान, शुक्ला यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे सांगत पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे महिलेच्या विश्वासात दिले. याच वेळी त्यांनी लग्नाचे आश्वासन देत संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

मात्र कालांतराने शुक्ला यांनी लग्नाचा विषय टाळण्यास सुरुवात केल्याने संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून सध्या आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नितीन शुक्ला यांनी यापूर्वी एफ-नॉर्थ वॉर्डमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांच्याकडे के-ईस्ट वॉर्डचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता आणि पुढे त्यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.या घटनेमुळे पालिका प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

4 तास ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

5 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

5 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

5 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

19 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

19 तास ago