महाराष्ट्र

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवत फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून शुक्ला यांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिला यांची ओळख विक्रोळीतील बिल्डिंग प्रपोजल विभागात काम करत असताना झाली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख पुढे वैयक्तिक जवळिकीमध्ये बदलली.

दरम्यान, शुक्ला यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे सांगत पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे महिलेच्या विश्वासात दिले. याच वेळी त्यांनी लग्नाचे आश्वासन देत संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

मात्र कालांतराने शुक्ला यांनी लग्नाचा विषय टाळण्यास सुरुवात केल्याने संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून सध्या आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नितीन शुक्ला यांनी यापूर्वी एफ-नॉर्थ वॉर्डमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांच्याकडे के-ईस्ट वॉर्डचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता आणि पुढे त्यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.या घटनेमुळे पालिका प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

5 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

5 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

5 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

5 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

7 तास ago