५ महिन्यात तब्बल २७९ पुरुष बेपत्ता…
संभाजीनगर: गेल्या ५ महिन्यात संभाजीनगर शहरातील तब्बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे पुरुषांच्या बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे यांसारखी कारणे पुढे येत आहेत. त्यातही यात उच्चशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांतील पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता पुरुषांचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानसिक कमकुवतपणा हेच आहे मूळ कारण
समस्यांना सामोरे न जाणे, समाजाचा दबाव, कुटुंबातील प्रश्न हाताळता न येणे, वाढत्या अपेक्षा, सततचे अपयश आणि तणावपूर्ण नातेसंबंध यांमुळे घर सोडून जाणार्यांचे वाढते प्रमाण हा चिंताजनक विषय आहे. त्यासाठी समस्या हाताळण्याचे कौशल्य, कुटुंबातील संवाद आणि सामंजस्य यांतून हे प्रश्न सोडवता येतात. रागाच्या भरात घर सोडून जाण्यापेक्षा जवळचे मित्र, वरिष्ठ आणि मार्गदर्शक यांच्यासमवेतच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो. कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांवर समाजाचे अधिक ओझे असते. त्यातून हे प्रकार होत असावेत, असे मत समुपदेशक संदीप शिसोदे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…