महाराष्ट्र

स्वाभिमानाचा आणि आत्मसिश्वासाचा हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज; खासदार राहुल शेवाळे

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील आर सी एफ कर्मचारी संघ (बी एम एस ) या कामगार संघटनेच्या वतीने सिंहगड किल्ला ते चेंबूर अशी शिवज्योत आणण्यात आली.

शिवज्योतीच्या आगमनाच्या प्रसंगी आर सी एफ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर, सुभेदार नरवीर तानाजी – सूर्याजी मालुसरे यांचे पोलादपूर तालुक्यातील वंशज रवींद्र मालुसरे, खासदार राहुल शेवाळे, आर सी एफ कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष संजय उपाध्याय, कार्याध्यक्ष राजेश सिंग, नगरसेवक महादेव शिवगण, माजी नगरसेविका श्रीमती निर्मला सिंग, माजी नगरसेविका राजेश्री पालांडे यांच्यासह विविध संघटनांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रवींद्र मालुसरे यांचा यावेळी शाल, पगडी, सन्मानचिन्ह प्रदान करून खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मी माझ्या मनगटाच्या बळावर स्वतंत्र राज्य मिळवून रयतेचा राजा होणार. हा स्वाभिमानाचा, आत्मसिश्वासाचा हुंकार त्यापूर्वी तीनशे वर्षे महाराष्ट्र भूमीवर उमटला नव्हता तो शिवाजी महाराजांच्या रूपाने प्रगट झाला.स्वराज्य स्थापन केले आणि ते सुराज्य कसे होईल याकरता ते सतत प्रयत्नशील राहिले. शिवाजी राजांचे कार्य हे आपले आहे असे त्या वेळच्या मावळ्यांना आणि रयतेला वाटत होते त्यामुळे नरवीर तानाजी, बाजी, शिवा काशीद यांनी लढताना आत्मसमर्पण केले. शिवाजी महाराज हे वारसा हक्काने राजे बनले नव्हते ते त्यांनी स्वतः एक राज्य निर्माण केले. त्यामुळे ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर साऱ्या राष्ट्राचेच नेते होते.

यावेळी रवींद्र मालुसरे यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासाचा मागोवा घेताना म्हणाले की, पुरंदरच्या तहानंतर राजांच्या कल्पनेतला भूगोल बिघडला होता, परंतु तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याच्या लढाईत महापराक्रम केला, स्वतः धारातीर्थी पडले गड जिंकला आणि त्या इर्षेतून पुढेमावळ्यांनी गेलेले सर्व किल्ले पुन्हा जिंकले. आणि छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. महाराजांचा हा इतिहास कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेतलेल्या आपल्या मुलांना सांगितला पाहिजे, मराठीतून त्यांना वाचायची सवय लावली पाहिजे. अन्यथा आपण शिवाजी महाराज की आणि मुले फक्त ‘जय’ म्हणतील.

कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी संदीप कदम यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. आर सी एफ महिला मंचच्या वतीने पारंपरिक वेषभूषेसह लेझीम नृत्य करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. सूत्रसंचालन शिवप्रसाद कांबळे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

2 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

23 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

23 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

23 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

23 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago