महाराष्ट्र

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात

पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री Shambhuraj Desai यांनीही या उपक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांसोबत बैलगाडीचे सारथ्य केले. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांनी त्यांचा उत्साह वाढवला आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला.

वाजंत्र्यांच्या गजरात, ग्रामस्थांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत आणि टाळ्यांच्या कडकडाटात चिमुकल्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेत आगमनानंतर मंत्री देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण संस्कृती, शिक्षणाबद्दलची आस्था आणि शाळेविषयीचा ग्रामस्थांचा जिव्हाळा या उपक्रमातून अधोरेखित झाला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या स्वागतासाठी एकवटलेल्या गावकऱ्यांचा उत्साह यामुळे मरळी येथील शाळा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

13 मिनिटे ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

38 मिनिटे ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

1 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

5 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

5 तास ago

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…

5 तास ago