महाराष्ट्र

‘माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार; महिला सक्षमीकरणाला चालना असल्याचा दावा

योजनेमुळे कुटुंबाचा आर्थिक भार हलका होण्यास आणि महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याचे समर्थकांचे मत

मुंबई : राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळून त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचा दावा योजनेच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी या योजनेतून मिळालेल्या मदतीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, घरगुती गरजा भागवण्यासाठी, आरोग्यावरील खर्चासाठी तसेच स्वावलंबनाच्या दिशेने पावले उचलण्यासाठी केल्याचे सांगितले जात आहे.

योजनेच्या समर्थकांच्या मते, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासह त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ झाली. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून महिलांच्या कष्टांचा सन्मान करणारा उपक्रम असल्याचेही ते नमूद करतात.

समर्थकांच्या म्हणण्यानुसार, महिलांच्या हातात आर्थिक बळ आल्याने कुटुंबाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली असून मुलांचे शिक्षण, घरातील दैनंदिन गरजा आणि आरोग्यविषयक खर्च भागविण्यास अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अशा योजनांचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले जात असून, महिलांचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही समर्थकांचे म्हणणे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

2 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

2 तास ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

2 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…

2 तास ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

6 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

6 तास ago