महाराष्ट्र

सातारा बसस्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढील बाजूने ‘आऊट गेट’चा प्रस्ताव

सातारा: सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने (पारंगे चौक) स्वतंत्र ‘आऊट गेट’ काढण्याचा सुधारित आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, प्रांत अधिकारी आशिष बारकोल, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

बैठकीदरम्यान बसस्थानकाचा सध्याचा आराखडा सादर करण्यात आला. मात्र, नव्या ‘आऊट गेट’चा त्यामध्ये कुठेही उल्लेख नसल्याचे लक्षात येताच मंत्री भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक जटिल बनत असून तो तातडीने सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील बाजूने बसेस बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग काढून सुधारित आणि अद्ययावत आराखडा तयार करावा, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

विभाग नियंत्रक श्रीमती गायकवाड आणि इतर अधिकाऱ्यांनी काही कारणे देत चालढकल करण्याचा प्रयत्न केल्याने मंत्री भोसले आणि जिल्हाधिकारी पाटील यांनी त्यांना खडसावले. “प्रस्ताव कसा मंजूर करून घ्यायचा हे मी पाहतो; मात्र आराखडा व्यवस्थित आणि सर्व सुविधांसह तयार झाला पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा

बैठकीत आपटी-तपोळा पुलासाठी रस्ता अधिग्रहण, वर्णे आबापुरी तीर्थक्षेत्र विकासकामे, आंबेघर तर्फ कुडाळ येथील जमीन विषय, म्हसवे (ता. सातारा) येथील कातकरी गृहसंकुलासाठी २० टक्के वाढीव अनुदान व लाभार्थी सर्वेक्षण, कुशी (ता. सातारा) येथील डवरी समाजासाठी घरकुल योजना, नागेवाडी येथील आयटी पार्क प्रस्ताव, परळी (ता. सातारा) येथील सहा गावांचे एलजीडी कोड, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी आणि तांडावस्ती प्रस्ताव मंत्रालयात सादर करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

आपटी-तपोळा पुलासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण करून संबंधित शेतकऱ्यांना निकषानुसार मोबदला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच नागेवाडी येथील आयटी पार्कसाठी जमीन नकाशा तयार असून दोन दिवसांत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा देण्याचा भर

सध्याच्या बसस्थानक रचनेत बदल न करता आराखडा तयार करण्याबाबत मंत्री भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, वाहतूक सुरळीत व्हावी आणि शहरातील कोंडी कमी व्हावी, यासाठी आधुनिक आणि व्यवहार्य असा सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले.वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा स्पष्ट इशारा बैठकीत देण्यात आला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

2 दिवस ago