महाराष्ट्र

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले की, राज्याने परकीय गुंतवणुकीसाठी मोठे उद्दिष्ट ठेवले असून दावोस जागतिक आर्थिक मंच येथे महाराष्ट्राने सर्वाधिक सामंजस्य करार करून देशात आपले अग्रस्थान टिकवले आहे. अपूर्ण जलप्रकल्प पूर्ण करून शेती क्षेत्राला चालना देण्यासह प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यावर शासनाचा भर आहे.

सातारा जिल्ह्यातील ‘मॉडेल स्कूल’ व ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनांचे सादरीकरण थेट नरेंद्र मोदी यांच्यासमोर झाले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर निधीतून ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू असून विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी पालकमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच कर्नल महाडिक स्मृती उद्यानात आदरांजली अर्पण केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सुनेत्रा वहिनींवर टीका म्हणजे महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान; काँग्रेसने आधी स्वतःचा इतिहास पाहावा; धनंजय मुंडे

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेचा आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत…

2 मिनिटे ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

5 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

16 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

16 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

20 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

20 तास ago