महाराष्ट्र

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले की, राज्याने परकीय गुंतवणुकीसाठी मोठे उद्दिष्ट ठेवले असून दावोस जागतिक आर्थिक मंच येथे महाराष्ट्राने सर्वाधिक सामंजस्य करार करून देशात आपले अग्रस्थान टिकवले आहे. अपूर्ण जलप्रकल्प पूर्ण करून शेती क्षेत्राला चालना देण्यासह प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यावर शासनाचा भर आहे.

सातारा जिल्ह्यातील ‘मॉडेल स्कूल’ व ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनांचे सादरीकरण थेट नरेंद्र मोदी यांच्यासमोर झाले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर निधीतून ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू असून विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी पालकमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच कर्नल महाडिक स्मृती उद्यानात आदरांजली अर्पण केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

11 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

19 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

19 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

19 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

19 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

19 तास ago