महाराष्ट्र

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

स्वतंत्र चौकशीची अमोल मातेले यांची मागणी

मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊनही केवळ सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांचेच प्रवेश पूर्ण झाल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.

ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर किमान ९० टक्के प्रवेश पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक संभ्रमाच्या स्थितीत आहेत. उर्वरित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी फेऱ्या घ्याव्या लागल्यास महाविद्यालयांचे नियमित अध्यापन किमान आणखी एक महिना उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

निकाल लवकर जाहीर केल्याचा सरकारने गाजावाजा केला, मात्र प्रवेश प्रक्रियाच वेळेत पूर्ण होत नसेल तर लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रवेश प्रक्रियेत अनावश्यक विलंब का होत आहे, जागा उपलब्ध असूनही प्रवेश का होत नाहीत, यामागे तांत्रिक किंवा प्रशासकीय त्रुटी आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या हिताशी संबंधित या प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार, हलगर्जीपणा किंवा अनियमितता झाली आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्य मागण्या :

तीन फेऱ्यांनंतरही कमी प्रवेश होण्यामागील कारणे तातडीने जाहीर करावीत.

प्रवेश प्रक्रियेचे स्वतंत्र व निष्पक्ष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे.

रिक्त जागा आणि प्रवेशांची संपूर्ण आकडेवारी सार्वजनिक करावी.

उर्वरित प्रवेश प्रक्रिया वेगाने पूर्ण करून महाविद्यालये नियमित सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.

विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी पारदर्शक आणि वेळबद्ध प्रवेश प्रक्रिया राबवावी.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रवेश प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष विद्यार्थी व पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जागतिक MSME दिनानिमित्त वाशीत ‘महाराष्ट्र MSME परिषद व पुरस्कार 2026’

मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी…

55 मिनिटे ago

श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट…

1 तास ago

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची…

1 तास ago

शिरूर! घोडनदी किनारी गावठी हातभट्टीवर छापा; मुद्देमाल जप्त, दोघे फरार…

शिरूर : शिरूर पोलिसांनी निमोणे गावाच्या हद्दीतील भोसेवाडी परिसरात घोडनदी किनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर…

2 तास ago

विड्याचे पान खाण्याचे फायदे

जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.…

6 तास ago

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

21 तास ago