महाराष्ट्र

मुंबईतील मृत्यूंवरून फडणवीस सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नसून सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी राज्यातील पावसाळी परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी आणि पूर्वतयारी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे नागरिकांचे जीव जात असल्याचे त्यांनी म्हटले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर सुमारे ७,१८१ कोटी रुपये खर्च करूनही अवघ्या दोन महिन्यांत वाहतूक बंद ठेवावी लागल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प ‘टेस्टिंग पिरियड’मध्ये असल्याचे केलेले विधानही सपकाळ यांनी फेटाळले. २०१४ पासून राज्यात भाजपचे सरकार असून अजूनही ‘टेस्टिंग’ सुरू असल्याचे सांगणे हे जनतेची दिशाभूल करणारे असल्याची टीका त्यांनी केली.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरही टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खुर्च्यांचा खेळ आणि सत्तेचा ताप

मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा…

27 सेकंद ago

RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत…

3 मिनिटे ago

राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचा हल्लाबोल; चंपत राय, अनिल मिश्रांवर कारवाईची मागणी

मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल…

8 मिनिटे ago

करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर…

12 मिनिटे ago

अतिवृष्टीमुळे अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या…

15 मिनिटे ago

‘मिसिंग लिंक’ धोकादायक; भ्रष्टाचाराचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा; अनंत गाडगीळ

मुंबई: मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व वास्तुविशारद…

57 मिनिटे ago