महाराष्ट्र

RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागात संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करत काही अधिकाऱ्यांची नावे आणि कथित ऑडिओ क्लिप सभागृहात सादर केल्या.

वडेट्टीवार यांनी नागपूरसह विदर्भातील काही RTO कार्यालयांमध्ये चोरीच्या वाहनांची नोंदणी, बेकायदेशीर वसुली आणि करचुकवेगिरीचे प्रकार होत असल्याचा आरोप केला. तसेच १५ वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

सभागृहात बोलताना त्यांनी काही अधिकारी मिळून वसुलीचे रॅकेट चालवत असून सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ACB ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिपही त्यांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केल्या.

महागड्या आयातीत वाहनांची नोंदणी महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत करून राज्याच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचाही मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.या आरोपांवर उत्तर देताना सरकारने प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली. IPS अधिकारी प्रियांका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय SIT एका महिन्याच्या आत अहवाल सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली.

सरकारने स्पष्ट केले की, सभागृहात करण्यात आलेल्या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल. सेवेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल तपासणी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

याशिवाय महाराष्ट्रात वास्तव्यास असूनही इतर राज्यांत वाहन नोंदणी करून करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियम अधिक कडक करण्याचा विचार सुरू असल्याचेही सरकारने सांगितले. वाहन नोंदणीवेळी राहण्याचा पुरावा, कर्जाची माहिती आणि GST पडताळणी अधिक काटेकोर करण्याची प्रक्रियाही मजबूत करण्यात येणार असल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

4 तास ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

4 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

4 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

4 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

4 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

5 तास ago