मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी केली. तसेच एसआयटी चौकशी ही केवळ धुळफेक असल्याचा आरोप करत चंपत राय आणि अनिल मिश्र यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
नाशिक येथील काळाराम मंदिरातून काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात खासदार शोभा बच्छाव, मोहन जोशी, शरद अहिर, निलेश (बब्लू) खैरे, रमेश कहांडोळे, भरत टाकेकर, संदीप पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
सपकाळ यांनी आरोप केला की, रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या अब्जावधी रुपयांच्या देणग्या आणि सोने-चांदीच्या वस्तूंचा कथित गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, “आदिवासी, मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक समाजातील कोणी आरोपी असता तर त्यांच्या घरावर तातडीने बुलडोझर चालवला गेला असता. मग चंपत राय आणि अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पुढे आरोप केला की, राम मंदिर ट्रस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांची नियुक्ती करण्यात आली असून ट्रस्टला माहितीच्या अधिकाराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रामभक्तांच्या देणग्यांचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशीही त्यांनी मागणी केली.
काँग्रेसचा हा सत्याग्रह ९ जुलैपासून राज्यभर राबविण्यात येणार असून, “प्रभू रामाच्या नावावर कथित गैरव्यवहार करणाऱ्यांना प्रायश्चित्त करावे लागेल,” असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका…
मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा…
मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर…
मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या…
मुंबई: मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व वास्तुविशारद…