महाराष्ट्र

राज्यसभा जागेवर काँग्रेसचा ठाम दावा; महाविकास आघाडीची निर्णायक बैठक

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी आपापली मते मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असून, शिवसेनाही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल, असा विश्वास व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले की, “आम्ही सर्वजण आपल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल.”राज्यसभा उमेदवारी अर्जासाठी ५ मार्चपर्यंत मुदत असल्याने मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मालेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया

मालेगाव प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये. मात्र सध्या रमजानचा महिना सुरू असून रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते. या प्रकरणाचा विनाकारण वाद घातला जात असून तो पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे, असा आरोप त्यांनी केला.

“समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांनाही सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

4 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

4 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

4 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

4 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

4 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

4 तास ago