गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती.
मुंबई: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली असून ही समिती गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला भेट देणार आहे.
काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, नांदेड दक्षिण ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, प्रदेश उपाध्यक्ष यशपाल भिंगे, सरचिटणीस डॉ. दिनेश नखाते, ऍड सुरेंद्र घोडजकर, श्रावण रॅपनवाड, रेखा चव्हाण व सचिव धनराज राठोड यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल आणि काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करेल.
शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…