गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती.
मुंबई: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली असून ही समिती गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला भेट देणार आहे.
काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, नांदेड दक्षिण ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, प्रदेश उपाध्यक्ष यशपाल भिंगे, सरचिटणीस डॉ. दिनेश नखाते, ऍड सुरेंद्र घोडजकर, श्रावण रॅपनवाड, रेखा चव्हाण व सचिव धनराज राठोड यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल आणि काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करेल.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…