मुख्य बातम्या

टाकळी हाजीतील आरोग्य अधिकाऱ्यांची सेवा ‘रामभरोसे’;  ग्रामस्थांकडून बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई व कर्तव्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून होत असून आधिकारी निवासी राहत नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वरीष्ठ अधिकार्यांनी चौकशी करून तात्काळ बदली करून जबाबदार व कर्तव्यदक्ष अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.या आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल १२ गावे व ४ उपकेंद्रांचा समावेश आहे. पंचक्रोशीतील सर्वसामान्य रुग्ण औषधोपचारासाठी येथे येत असतात. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असली तरी प्रत्यक्षात उपकेंद्राकडे अधिकारी फिरकत नसल्याने नागरिकांना आरोग्य सेवेसाठी वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे, नियुक्त वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्राच्या निवासस्थानी न राहता ते शिरूर येथे राहतात. त्यामुळे ते सकाळी येऊन दुपारीच केंद्रातून निघून जातात. त्यामुळे रुग्णांना योग्य ऊचपार मिळत नाही.

स्थानिक कर्मचारी रुग्णांना वेळेवर उपलब्ध होतात, मात्र शिरूरमध्ये राहणारे अधिकारी नियमितपणे वेळेत उपलब्ध राहत नाहीत. परिणामी गरोदर महिलांसह, सर्पंदश, साथीचे आजार, हृदय विकाराचा झटका या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात शिरूर किंवा मंचर. नारायणगाव येथे दूर जावे लागते. यामुळे वेळ, खर्च आणि मानसिक त्रास वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याच्याही घटना घडल्या आहे. या भागामध्ये अपघातांची संख्या वाढली असून अपघातग्रस्त रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उपचार भेटत नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून अशा अधिकाऱ्यांना तात्काळ तेथून हलवा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

सध्या पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका असताना आरोग्य केंद्राकडून अपेक्षित सेवा न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन निवासी नसलेल्या व बेजबाबदार अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

46 मिनिटे ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

50 मिनिटे ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

54 मिनिटे ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

1 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

2 तास ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

2 तास ago