महाराष्ट्र

एलपीजी दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन

मुंबई: केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका करत या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने गुरुवारी (१२ मार्च) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढीबरोबरच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आला असून अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. काही ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आल्याचेही सांगितले जात आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे गॅस व इंधन पुरवठ्याचे योग्य नियोजन नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आखाती भागातील युद्धपरिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असले तरी गॅसचा तुटवडा नसल्याचा सरकारचा दावा चुकीचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत असून हॉटेल व खानावळ व्यवसायिकांनाही सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत.

एलपीजी दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना गॅस सिलेंडर सहज उपलब्ध करून द्यावेत, या मागण्यांसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, विविध सेल व विभागांचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

4 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

4 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

4 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

4 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

8 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

8 तास ago