महाराष्ट्र

महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन…

राज्यातील महानगरपालिकांमधील ‘प्रशासनराज’ मुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीचे काम करत असून जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महानगरातील जनतेच्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात आज आंदोलन केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरुद्ध नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढून महानगरपालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोग्य, पाणी, रस्ते, शैक्षणिक व सुरक्षा मुलभूत हक्कांसाठी तसेच महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पनवेल महानगरपालिकेच्या कारभार विरुद्ध पनवेल तालुका व पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, प्रदेश सचिव मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस प्रभारी राणी अग्रवाल, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर विविध नागरी समस्यांबाबत आंदोलन करून आयुक्त अनिलकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस जो जो थॉमस, प्रदेश सचिव धनराज राठोड, वसई विरार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ओनिल अल्मेडा आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर धरणे आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, वीरेंद्र जगताप, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकरेत उपस्थित होते. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन शेतकरी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. डॉ. कल्याणराव काळे, जिल्हा पक्ष प्रभारी माजी.आ.नामदेवराव पवार, माजी आ. कैलास गोरंट्याल, मा. आ. राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रातही आंदोलन करून भाजपा युती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

11 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

16 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

16 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

16 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

16 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

16 तास ago