मुंबई: प्रसार भारतीने पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग इतरत्र न हलवता तो जेथे आहे तिथेच सुरू ठेवावा. पुणे येथील कार्यालयात वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, तब्बल सात दशके आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र प्रसारित केले जाते. सुमारे २.४ दशलक्ष श्रोतावर्ग याचा लाभ घेत आहेत. हा विभाग बंद झाल्यास श्रोत्यांची गैरसोय होईल. पुणे विभागाने अडचणीच्या काळात देखील उत्कृष्ट काम करून दाखवलेले आहे. असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
यापूर्वीदेखील, पुणे आकाशवाणी केंद्रावरील स्थानिक कार्यक्रम रद्द करून मुंबई केंद्रावरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा प्रसार भारतीचा आदेश तातडीने रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
लोकप्रिय आकाशवाणी पुणे केंद्र बंद करण्याऐवजी अधिकाधिक सक्षम कसा होईल याकरिता पूर्णवेळ सनदी अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. यासंदर्भात प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि राज्यपाल रमेश बैस यांना पत्र देण्यात आले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…