महाराष्ट्र

अनाथ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार; उच्च शिक्षणासाठी पुढाकार

 

ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde खंबीरपणे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची दखल घेत त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठाणे पालिका आणि Rainbow Foundation संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ५५ ते ७२ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थ्यांपैकी दोघांना विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअर बनायचे आहे, तर एकाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि दुसऱ्याला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर घडवायचे आहे.

विद्यार्थ्यांच्या या स्वप्नांची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश Anand Vishwagurukul Junior College येथे तातडीने निश्चित करण्याचे निर्देश संस्थेचे सचिव डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांना दिले आहेत.

यावेळी विद्यार्थ्यांना केवळ प्रवेशच नव्हे, तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक ती मदत व आधार देण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयामुळे चारही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तुम्हालाही सारख्या शिंका येतात का? पाहा शिंका येण्याची कारण

आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात…

1 तास ago

विकास लवांडे यांच्यावरील हल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान; हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची…

1 तास ago

पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची आस्थेवाईक विचारपूस

कोलकाता : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची आणि…

2 तास ago

पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रहितासाठी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर आणि खाद्यतेलाच्या…

2 तास ago

शिवसेनेचा राज्यव्यापी संवाद दौरा; डॉ. श्रीकांत शिंदे २२ जिल्हे, १०० हून अधिक मतदारसंघ पिंजून काढणार

मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी…

2 तास ago

कोकण महाराष्ट्राच्या विकासाचा कणा! दादांची विकासदृष्टी पुढे नेणार; सुनेत्रा पवार

रोहा: “कोकण म्हणजे साक्षात देवभूमी असून इथल्या लोकांनी कष्टाने ही भूमी घडवली आहे. कोकण हा…

2 तास ago