ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde खंबीरपणे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची दखल घेत त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ठाणे पालिका आणि Rainbow Foundation संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ५५ ते ७२ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थ्यांपैकी दोघांना विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअर बनायचे आहे, तर एकाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि दुसऱ्याला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर घडवायचे आहे.
विद्यार्थ्यांच्या या स्वप्नांची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश Anand Vishwagurukul Junior College येथे तातडीने निश्चित करण्याचे निर्देश संस्थेचे सचिव डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांना दिले आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांना केवळ प्रवेशच नव्हे, तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक ती मदत व आधार देण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयामुळे चारही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.