महाराष्ट्र

त्या गावात मृत्यूचे तांडव, अवघ्या दीड महिन्यात 24 जणांचा मृत्यू

ग्रामस्थांकडून देवाचा धावा, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल

कानपुर: अवघ्या दोन हजाराच वस्तीचे हे गाव. पाच-सहा गल्ल्या, मोठे दोन-तीन चौक, मंदिर, पार, पंचायत आणि आजुबाजूला शेतवस्ती. इतर गावांप्रमाणेच येथील दैनंदिन व्यवहार सुरू होते. पण गेल्या दीड महिन्यात या गावातील वातावरण बदलले आहे. या दीड महिन्यात येथील 24 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. जणू पंचकच लागले म्हणा ना. पण हे पचंक काही पूर्ण झालेले नाही. एका मागून एक गावकरी स्वर्गवासी होत असल्याने महिला आणि पुरुष दहशतीखाली आले आहेत. आता तर गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील एका साधु पुरुषाचे पाय धरले आहेत. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी गावातील जागेश्वर मंदिरात गावकरी संकट टळण्यासाठी मंत्रोपच्चार आणि पूजा करणार आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूर जवळ सुल्तनापूर नावाचे गाव आहे. येथे महिला, पुरुषच नाही तर तरुणांचा आकस्मिक मृत्यू होत असल्याने गावकरी दहशतीखाली आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच गावातील सीलू यांचा मृत्यू झाला. ही बाब समजल्यावर बाहेर गावी असलेले कल्लू आणि श्याम सिंह हे गावाकडे निघाले. पण रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मग गावात एकाच दिवसी तीन अंतयात्रा निघाल्या. त्यापू्र्वी अवघ्या महिनाभरात 21 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सातत्याने अशाच घटना घडत असल्याने गावकऱ्यांना घाम फुटला आहे.

गावात एक आठवड्यापूर्वी माळदाच्या घरावरून पडून सरमन यांचा मृत्यू ओढावला. तर गावातीलच अनिल, गौरव आणि अंकित हे तिघे असेच आकस्मिक गेले. सातत्याने अशा घटना घडत आहेत. कोणी विहिरीत पडून तर कुणाच्या अंगावर झाड पडून, कोणी रस्ते अपघातात. तर कुणावर वीज पडून, मयतांचा हा आकडा आता 24 वर गेला आहे. गावकरी या घटनांमुळे भयभीत झाले आहे. या गावावर मृत्यूची छाया पडल्याच्या भीतीने गावकरी घामाघूम झाले आहेत. उद्या कुणाचा नंबर असेल याचीच चिंता त्यांना सतावत आहे.

पंचक्रोशीत पिरोना आश्रम आहे. तिथे एक साधू राहतात. गावकऱ्यांनी मग त्यांच्याकडे धाव घेतली. गावा शेजारील सर्वात जुन्या जागेश्वर मंदिरात त्यांनी पूजा केली. श्रावणातील पहिल्या सोमवारी पुन्हा पूजा करण्यासाठी गावकरी जातील. पिरोना आश्रमातील साधुंनी गावकऱ्यांना कन्या भोज करण्याचा सल्ला दिला आहे. तर राम नाम आणि ऊँ नमःशिवाय जप करण्यास सांगितले आहे. बाबाजी लवकरच या गावात येणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अल्पवयीन मुलांना ऑनलाइन जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग; नीलम गोऱ्हेंचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींना ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया आणि चॅटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग, लैंगिक…

6 तास ago

वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरून निशाणा

मुंबई: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांसह…

6 तास ago

आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे.…

6 तास ago

शिंदेसेनेला भाजपाची धास्ती? राऊतांचा फडणवीसांना इशारा; मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा गौप्यस्फोट ते सपकाळांची टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदांपासून विरोधकांच्या सरकारवरील टीकेपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय…

7 तास ago

महाराष्ट्रातील 10 प्रमुख MIDC; पुणे ठरतेय औद्योगिक केंद्र, उद्योजकांच्या स्थलांतराने राजकारण तापले

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर पुणे जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्याला…

7 तास ago

उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; १७ हजारांचा मुद्देमाल लंपास

न्हावरे (अक्षय टेमगिरे): उरळगाव (ता. शिरुर) येथील गट क्रं १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने…

7 तास ago