महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीक्षाभूमीला भेट

भगवान गौतम बुद्धाना वंदन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला केले विनम्र अभिवादन

नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केले. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना त्यांनी, दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून भेट देतो. इथे येऊन एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळत असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी याच दीक्षाभूमीवर दीक्षा घेऊन लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या माध्यमातून दीक्षाभूमी परिसर विकासासाठी विशेष प्रयत्न केले गेले होते. तसेच दादरच्या चैत्यभूमीच्या बाजूला इंदू मिलमधील स्मारक देखील पूर्ण करण्याला देखील महायुती सरकारने प्राथमिकता दिलेली आहे. त्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य व्यक्ती सर्वोच्च पदी बसू शकला, सर्वसामान्य कुटूंबातील नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान तर माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा अडीच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला हे केवळ संविधानामुळेच शक्य झाले असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी त्यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाचे) राजेंद्र गवई तसेच शिवसेनेतील सहकारी मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आमदार मुरजी पटेल हेदेखील यावेळी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

13 मिनिटे ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

9 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

9 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

10 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

15 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

15 तास ago