महाराष्ट्र

गतिमान सरकार शेतकरी, विद्यार्थी, जनतेचे प्रश्न सोडविण्यास ठरले अकार्यक्षम

नागपूर: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला आलेलं अपयश , उद्योग विभागात राज्याचा घसरलेला क्रमांक, बनावट औषधे घोटाळा, जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था आदी प्रश्न सोडविण्यास गतिमान सरकार अकार्यक्षम ठरले आहे, अशा खरमरीत शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली.

देशात महाराष्ट्राचे उद्योगातील स्थान 13 व्या क्रमांकावर घसरले आहे. उद्यम योजनेत छोटे आणि लघु उद्योगांची महाराष्ट्रात 9 लाख 86 हजार 330 उद्योगांची नोंदणी झाली, मात्र मराठवाडयात 1 लाख 28 हजार (13 %)आणि विदर्भात 1 लाख 39 हजार (14%) उद्योगांची नोंद झाली आहे.मुंबई, पुण्यात जागा नसताना तिथे उद्योग असावे, असा आग्रह उद्योजकांचा आहे.नागपूर मिहान येथे प्राथमिक सुविधा नसल्याने कंपन्या येण्यास तयार नाही. गडचिरोली जिल्ह्यातील पुंज लॉइड कंपनीला मोठया प्रमाणात खणीकर्मासाठी जमीन देण्यात आली. घोटी सिन्नर येथे सेझ निर्माण करण्यासाठी भूसंपादनात

एमआयडीसीसोबत संगनमत करून उद्योजकांनी जमीन खरेदी विक्री केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. बिडकीन सेकंड स्पेस होण्याची आवश्यकता आहे. उद्योग विभागाने दाओस येथे 1 लाख 50 हजार कोटी रुपयांचे करार केल्याचे म्हटले आहे मात्र हे करार स्थानिक भारतीय कंपन्यांसोबत केले आहे. त्यातील किती कराराची अंमलबजावणी झाली याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

नाशिक, संभाजीनगर व ठाणे येथील बंद इंडस्ट्रीच्या जमिनीवर कमर्शियल निवासी प्लॉट उभारले जात आहेत. हिंजेवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या पार्कमध्ये कार्यरत आहेत. मात्र अपुऱ्या पायाभूत सुविधांअभावी या पार्कला उतरती कला लागली असून कंपन्या या परराज्यात स्थलांतर करत आहेत. बंगलोरच्या तुलनेत पुणे आयटी पार्क मागे का पडले याचा विचार करून तेथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी दानवे यांनी केली. राज्यातील विजेचा दर मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे उद्योग स्थलांतर होत आहेत. डीपी नसल्याने शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत नाही. विजेच्या मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे राज्य प्रगतीच्या दृष्टीने जात असताना यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त केली.

राज्यातील बनावट औषध घोटाळ्यातील रॅकेट मध्ये तत्कालीन मंत्री सहभागी आहे का असा प्रश्न देखील दानवे यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा घसरलेला दर्जा, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेषच्या कापडाच्या रंगाची विसंगती आदींवर दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

एसटी महामंडळ नव्याने 1310 बसेस घेणार असल्याची निविदा प्रक्रिया पार पडली.यात आधीच्या बसेस या 44 रुपये किमी डिझेलसह उपलब्ध होत्या मात्र नवीन एसटी बसेस या डिझेलशिवाय 34 रुपये किंमतीने देण्यात येणार आहेत. यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केरळ तामिळनाडू येथील कंपन्यांना हे कंत्राट दिल्यामुळे

देशाच्या वर्तमानपत्रात बदनामी झाली आहे. राज्याच्या जनतेच्या पैशांचा गैरवापर केला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेल 20 टक्के शुल्क रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

7 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

8 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

9 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

14 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

14 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

14 तास ago