महाराष्ट्र

भाजप आमदार पडळकरांबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली मोठी माहिती, म्हणाल्या.

पुणे: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मी सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे,’ असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ओरडतात आणि त्यांना चिथावणी देतात,’ असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी विधिमंडळ परिसरात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोऱ्हे बोलत होत्या.

‘हाणामारीची सुरुवात पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून झाली का,’ असा प्रश्न विचारता, ‘त्यांच्यात सभागृहामध्ये सुधारणा झाली, असे मला म्हणायचे आहे. सभागृहाबाहेर काय होते, त्यावर मी बोलत नाही,’ असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. ‘उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले, तरी आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत,’ असेही त्या म्हणाल्या.

‘मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही नाहीत’

‘हिंदी भाषेची सक्ती करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते हिंदीसाठी आग्रही नाहीत. या संदर्भात त्यांच्यावर होणारे आरोप तथ्यहीन आहेत,’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

काय झाले होते नक्की विधानभवन परिसरात

मुंबई येथे राज्याचे विधानसभा अधिवेशन सुरू होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद उमटले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू शाब्दिक चकमकीनंतर दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ एकमेकांना भिडले. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी देखील झाली. या घटनेचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला. या अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे. विधान भवन परिसरात आमदार आणि त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक वगळता इतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. कोणत्याही आमदारांचे कार्यकर्ते विधान भवन परिसरात आले आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आमदारावर असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

3 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

3 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

8 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

8 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

8 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

8 तास ago