महाराष्ट्र

भाजप आमदार पडळकरांबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली मोठी माहिती, म्हणाल्या.

पुणे: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मी सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे,’ असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ओरडतात आणि त्यांना चिथावणी देतात,’ असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी विधिमंडळ परिसरात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोऱ्हे बोलत होत्या.

‘हाणामारीची सुरुवात पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून झाली का,’ असा प्रश्न विचारता, ‘त्यांच्यात सभागृहामध्ये सुधारणा झाली, असे मला म्हणायचे आहे. सभागृहाबाहेर काय होते, त्यावर मी बोलत नाही,’ असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. ‘उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले, तरी आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत,’ असेही त्या म्हणाल्या.

‘मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही नाहीत’

‘हिंदी भाषेची सक्ती करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते हिंदीसाठी आग्रही नाहीत. या संदर्भात त्यांच्यावर होणारे आरोप तथ्यहीन आहेत,’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

काय झाले होते नक्की विधानभवन परिसरात

मुंबई येथे राज्याचे विधानसभा अधिवेशन सुरू होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद उमटले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू शाब्दिक चकमकीनंतर दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ एकमेकांना भिडले. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी देखील झाली. या घटनेचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला. या अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे. विधान भवन परिसरात आमदार आणि त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक वगळता इतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. कोणत्याही आमदारांचे कार्यकर्ते विधान भवन परिसरात आले आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आमदारावर असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

2 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

9 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

9 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

9 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

9 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

9 तास ago